आत्मसंयम योग

200.00

श्रीमद्भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायावरील स्वामी वरदानंद भारती यांचे भाष्य

Categories: ,

Description

प. पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या अनेक उत्तम ग्रंथांपैकी एक म्हणून ‘आत्मसंयम योग’ या ग्रंथाचा उल्लेख करता येईल. श्रावण वद्य ११ शके १९२४ या पवित्र दिवशी पूजनीय स्वामी श्री वरदानंद भारती ब्रह्मलीन झाले हे सर्व विश्रुत आहे. प. पू. स्वामीजींच्या संजीवन समाधीमुळे ते गीता जगत होते हे निर्विवादपणे स्पष्ट होते. अनुभूतीची विलक्षण सुंदर किनार त्यांच्या ‘आत्मसंयमयोग’ ह्या सहाव्या अध्यायावरील विवेचनरूपी महावस्त्राला लाभलेली आहे. गीता हे जीवनाचेच शास्त्र असल्याने त्याच्या व्यासंगाबरोबरच त्याचे प्रायोगिकही (प्रॅक्टिकल) प. पू. स्वामीजींच्या आपल्या जीवनात उतरविले.आत्मसंयमयोगाचे त्यांचे विवेचनही त्यांनी योगारूढ होऊन केले असले पाहिजे असे ग्रंथ वाचताना अनेक ठिकाणी जाणवण्याइतके ते विवेचन रेखीव नि निःसंदिग्ध झालेले आहे. ध्यानयोगाची अलौकिकता हा त्यांच्या जीवनात अनुभवाचा विषय होता. त्यामुळे गीता जीवनाचे शास्त्र कसे बनते ते त्यांनी आचरून दाखविले, असे निश्चयाने म्हणता येते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आत्मसंयम योग”

Your email address will not be published. Required fields are marked *