संकेतस्थळ उद्दिष्टे

ॐ  श्री  卐 ll श्रीशंकर ll निर्मोह: संयमी योगी शान्तो दान्तो विमत्सर: |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती ||सुप्रसन्न: समाधानी निश्चयी च दृढव्रती |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती || सज्जन हो, सप्रेम जयहरि. प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥ सत्कर्माची प्रेरणा देणारे, अकर्म टाळण्याची सूचना देणारे, सत्याचा निर्देश करणारे, सन्मार्ग दाखविणारे, उत्तम शिक्षण देणारे व सुबोध करणारे - असे सहा जन मनुष्यासाठी गुरु समान असतात, अशा अर्थाचे एक शास्त्र वचन आहे. यातील एका गुणाने संपन्न असलेला गुरु लाभला तरी मनुष्याचे कल्याण होणे निश्चित आहे. नारदभक्तिसूत्र सांगते -मुख्यतस्तु महत्कृपयैवभगवत्कृपालेशाद्वा ॥ महत्सङ्गस्त् दुर्लभोऽगम्योऽमोघश्च । लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥अर्थातप्रेमभक्तीच्या प्राप्तिचे साधन मुख्यत: महापुरुषांच्या कृपेने अथवा भगवंताच्या लवमात्र त्कृपेने सद्भक्ताला प्राप्त होते. तथापि महापुरुषांचा सङ्ग दुर्लभ, अगम्य आणि अमोघ आहे. भगवंताच्या कृपेनेच महापुरुषांचा संश्रय प्राप्त होतो. विवेक चूडामणि यात नमूद केले आहे -दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम् । मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ॥अर्थातज्यामुळे भगवत्कृपा प्राप्त होते, तो मनुष्यजन्म, मुमुक्षुत्व (मुक्त […]

आजचे दर्शन

वरदवाणी

Calendar Day 15

हरिभक्ताच्या संगतीत माणसाला बरें वाटतें. त्याची भेट झाली, त्यानें पाहिले, दोन वाक्ये तो बोलला, त्यानें प्रेमळ हाताने कुरवाळले, त्याच्या वरदहस्ताचा थोडासा स्पर्श मस्तकाला झाला, तरी माणसाचा संताप, खेद नाहीसा होतो, मन शांत होतें, वृत्तींना प्रसन्नता लाभते. अशा थोर हरिभक्ताने चार वाक्ये जरी उच्चारली तरी माणसाच्या अंतःकरणांतील नाना प्रकारचे संदेह दूर होतात, श्रद्धा बळावते, बुद्धि स्थिरावते. मात्र यासाठीं हरिभक्ताच्या संगतीत जाणाऱ्याचे मन सरळ असलें पाहिजे, प्रांजळ असलें पाहिजे, तो विनयी असला पाहिजे, अहंकारी असतां कामा नये. नाहीतर पाण्यात अखंड भिजूनहि सुसरीच्या पाठीला मऊपणा जसा येत नाहीं, ती तशीच कठोर, खडबडीत राहते, तसेंच याचेंहि व्हावयाचें.

१५