संकेतस्थळ उद्दिष्टे

ॐ  श्री  卐 ll श्रीशंकर ll निर्मोह: संयमी योगी शान्तो दान्तो विमत्सर: |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती ||सुप्रसन्न: समाधानी निश्चयी च दृढव्रती |सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती || सज्जन हो, सप्रेम जयहरि. प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥ सत्कर्माची प्रेरणा देणारे, अकर्म टाळण्याची सूचना देणारे, सत्याचा निर्देश करणारे, सन्मार्ग दाखविणारे, उत्तम शिक्षण देणारे व सुबोध करणारे - असे सहा जन मनुष्यासाठी गुरु समान असतात, अशा अर्थाचे एक शास्त्र वचन आहे. यातील एका गुणाने संपन्न असलेला गुरु लाभला तरी मनुष्याचे कल्याण होणे निश्चित आहे. नारदभक्तिसूत्र सांगते -मुख्यतस्तु महत्कृपयैवभगवत्कृपालेशाद्वा ॥ महत्सङ्गस्त् दुर्लभोऽगम्योऽमोघश्च । लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥अर्थातप्रेमभक्तीच्या प्राप्तिचे साधन मुख्यत: महापुरुषांच्या कृपेने अथवा भगवंताच्या लवमात्र त्कृपेने सद्भक्ताला प्राप्त होते. तथापि महापुरुषांचा सङ्ग दुर्लभ, अगम्य आणि अमोघ आहे. भगवंताच्या कृपेनेच महापुरुषांचा संश्रय प्राप्त होतो. विवेक चूडामणि यात नमूद केले आहे -दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम् । मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ॥अर्थातज्यामुळे भगवत्कृपा प्राप्त होते, तो मनुष्यजन्म, मुमुक्षुत्व (मुक्त […]

आजचे दर्शन

वरदवाणी

Calendar Day 11

ईश्वर नाहीं, परलोक ही खोटी कल्पना आहे, पुनर्जन्म हें थोतांड आहे, असें ज्यांना म्हणावयाचे असेल त्यांचें हें तर्कट गृहीत धरूनहि असे लोक केवळ शरीरसुखापुरतें पाहतील तरी त्यांचें कांही भले होण्याची शक्यता नाहीं. शरीराचे हित जें आरोग्य, तें विचारांत घ्यावयाचे ठरविलें तरी शरीरसुख प्रधान मानता येणार नाहीं. तिथेहि संयम, त्याग, सातत्य, प्रयत्न, कष्ट कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत स्वीकारावेच लागतील. इंद्रियांना वाटणारे सुख हे खरें सुख नाहीं हें मान्य करावेच लागेल. वैयक्तिक हिताचा विचार करतांनाहि हें लक्षांत घ्यावें लागतें. मग कुटुंब, समाज, राष्ट्र या अधिकाधिक व्यापक क्षेत्राचा विचार करतांना संयमादींचें महत्त्व लक्षांत घेणे भागच आहे. पण देहबुद्धि हा विचारच करूं देत नाही.

११