आपण ज्याला शास्त्र-शास्त्र असें म्हणतो तो प्रामाणिकांच्या दीर्घकालीन अनुभवांचा संग्रह असतो. म्हणून आपले वाटणे हें शास्त्राच्या कसोटीला उतरणारे नसेल तर ते अयोग्य आहे, त्यासंबंधीचा विचार पुन्हा नव्याने केला पाहिजे, एवढी तरी जाणीव मनुष्यास व्हावयास हवी.