कामनाच नको, कल्पनाच नको, असें संत म्हणत नाहींत. पण कामनेला आसक्तीचे स्वरूप येऊ नये, कामनेने चैनीलाच गरज मानूं नये, असें त्यांना सांगावयाचें आहे. म्हणून वावग्या कल्पना नसाव्या, विकृत कल्पना करूं नये, विचारांना भरकटू देऊं नये, असें संतांचे सांगणे आहे.