संताच्या ठिकाणची दया ही क्षमा, शांति या सत्त्वगुणाचा परिणाम असते. त्यात अगतिकता नाहीं, लाचारी नाहीं, दैन्य नाहीं. तो अल्पसंतुष्ट असतो. अयाचितवृत्तीनें राहील, कदाचित् भिक्षा मागेल, पण तो दीनवाणा भिकारी नाहीं. उलट आत्मतृप्त असल्यानें ईश्वरी प्रेमांत रंगून गेल्यामुळे परमेश्वरावरील दृढ विश्वासाने, संतांच्या ठिकाणीं कांहीं वेगळ्या प्रकारची मस्तीच पुष्कळवेळा दिसून येते. आत्मानंदांत ते धुंद असतात. जगाचे पाश त्यांना खेचू शकत नाहींत.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित