ज्ञानसंपादनासाठीं ज्यानें नमस्कार करावयाचा त्या जिज्ञासूच्या अंतःकरणांत त्यावेळीं आदर नि नम्रता हे भाव असलेच पाहिजेत. श्रद्धा, विश्वासाचींच तीं अंगें आहेत. ज्ञान मिळवावयाचें तर जिज्ञासू श्रद्धायुक्त, तत्पर आणि संयमशील असावाच लागतो तरच ज्ञान मिळते. “श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।” (भ. ४|३९) असें गीतेने स्पष्टपणे म्हटलें आहे.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित