आपण शिष्टाचार म्हणून, एक रूढी म्हणून किंवा मनांत नसले तरी लौकिकामध्ये नम्रता सिद्ध व्हावी म्हणून, नमस्कार करणें, जमिनीवर डोके टेकणें, पायांवर डोके ठेवणे, साष्टांग दंडवत घालणे, असें नमस्काराचे अनेक प्रकार करतो. पण त्यांत खरा विनय, खरा भाव, खरी श्रद्धा असते का?