घटपटाची खटपट किंवा अवच्छेदकावछिन्नाची लटपट यांच्या सहाय्याने, दुर्बोध पारिभाषिक संज्ञांच्या आधारावर, प्रक्रियांचे प्रतिपादन पुष्कळ कौशल्याने केलेलें आढळतें. जगद्गुरू श्रीशंकराचार्यांनीं प्रतिपादलेल्या अद्वैत मतांतहि “सर्वं खलु इदं ब्रह्म” हा सिद्धांत सिद्ध करणाऱ्या निरनिराळ्या १२८ प्रक्रिया आहेत असें म्हणतात. एखाद्याने त्या सर्वांचा खूप परिश्रमपूर्वक अभ्यास केला तर तो विद्वान् म्हणून मान्यता पावेल पण साक्षात्कारी होऊं शकणार नाहीं. हें सर्व वक्तृत्वामुळें वा प्रबंधामुळें लौकिकाचे साधन ठरेल, पण त्यांतून अनुभव उपलब्ध होऊं शकणार नाहीं, त्यासाठीं अंतःकरणानेंच निवाडा व्हावयास हवा, बुद्धीनेच विवेक केला पाहिजे.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

