माणसाला कोणाचें तरी मार्गदर्शन पत्करावे लागते. माणसाचे हें वैशिष्ट्य आहे. पाहिजे तर वैगुण्यहि म्हणावें. माणसाला शिकविणारा, समजावून देणारा लागतोच लागतो. नैसर्गिक प्रेरणेने त्याला फारच थोडे साधणे शक्य आहे, त्यादृष्टीनें तो पशुपक्ष्यांइतका किंवा कृमिकीटकांइतकाहि स्वतंत्र नाही. सर्व जीवकोटीमध्यें मनुष्य श्रेष्ठ खरा पण हें श्रेष्ठत्व अनुभविण्यासाठीं त्याला पदोपदी मार्गदर्शन पत्करावे लागतें.