सत्पुरुष दक्ष असतो. आवश्यक गोष्टी तो वेळच्यावेळी, योग्य रीतीने करणारच. मनुष्याचे जीवन हा एक प्रवास आहे आणि प्रवाशाने दक्ष राहिलेंच पाहिजे, नाहीतर तो लुटला जाईल, जायचे तिथे तो योग्य रीतीनें पोचणार नाहीं. वेंधळेपणा, गबाळेपणा, दीर्घसूत्रीपणा हा कांहीं सद्गुण नाहीं आणि सत्पुरुष आतून तरी तसा कधींच नसतो.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित