जुनें ठेवणें म्हणजे आपली परंपरा, आपलें धर्मशास्त्र, आपलें अध्यात्म, आपला अर्थकामाचा विचार, आपल्या भारतवर्षामध्ये मान्यता प्राप्त असलेली समाजविषयक धारणा, आपले नीतिनियम, आपलें तत्त्वज्ञान, आपला प्राचीन इतिहास, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, हें आपलें वाङ्‌मय माणसाला पशुत्वातून देवत्वाच्या पदवीवर नेऊन सोडणारे, नराचा नारायण करणारे, सामान्यालाहि सत्पुरुषाच्या पदावर चढण्याची संधी देणारे, सर्वांची सोय करून हितापर्यंत पोंचविणारें आहे.