ज्याचा त्याग केला पाहिजे तें टाकावेसे वाटत नाहीं, घेऊं नये ते स्वीकारावेसें वाटतें, करूं नये तें केलें जातें. आणि मग दुःख भोगण्यावांचून गति नसते. अंतःकरणाची, अंतःकरणवृत्तीची, या गुणांच्या पाशांतून सुटका झाली तरच खरें काय ते कळेल, आणि दुःख टळेल, पण हेंच अवघड आहे. भगवंतांनीं अर्जुनाला निस्त्रैगुण्य हो असें सांगितलें आहे तें यादृष्टीनेंच.