केवळ श्रवणच नव्हे तर त्या सवें चिंतन-मननावरहि भर दिला पाहिजे. शोध लागणे किंवा बोध होणें, या सहजासहजी होणाऱ्या, साधणाऱ्या गोष्टी नव्हेत. त्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. इहलोकाशी संबद्ध असलेल्या जड अशा विज्ञानातील सृष्टीचे नियम शोधतानांहि संशोधक शास्त्रज्ञांनी आपली आयुष्येच्या आयुष्ये वेचली आहेत. आपल्या सर्वशक्तीनिशी दीर्घकालपर्यंत चिंतनाचे आणि प्रयोगाचे कष्ट उपसले आहेत. वेडयाप्रमाणे इतर सर्व विसरून एकेका गोष्टीचाच पाठपुरावा केला आहे. इहलोकींच्या जड विज्ञानांत असें होतें तर परात्पर चैतन्याचे आकलन होण्यासाठीं “असेल माझा हरी l तरी मज देईल खाटल्यावरी ll” म्हणून कसें चालेल ? त्यासाठीं आपल्या सर्व शक्तीनिशी सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

