साधु हा उपभोग घेतो पण क्षमेचा आणि शांतीचा. त्यामुळें निंदा, अवहेलना, अपमान, तिरस्कार, उपेक्षा कितीहि जरी झाली, नाना प्रकारची संकटे कोसळली, आपत्ती आल्या, तरी त्याची चित्तवृत्ति निवांत जागी तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणें प्रसन्न आणि शांत असते. तो क्षमाशील असतो, सहनशील असतो. पण तो अगतिक नसतो, दुर्बल नसतो. लाचार, दुबळा माणूस निरुपायानें सहन करतो, पण त्याचे मन चरफडत असतें. याचें मन शांत असतें, आणि त्यामुळें क्षमाशीलता त्याला उपभोगाचे सुख देते.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित