मनुष्याला वेड्यासारखी आत्मविस्मृति झालेली असते. खुळ्या गिऱ्हाइकासारखा तो वेष्टणाला भुलतो. सत्यापर्यंत पोचू शकत नाहीं. कांहीं वेगळे सत्य यामागे आहे आणि ते जाणून घेतलें पाहिजे असेहि त्याला वाटत नाहीं. ज्ञानाची साधनें असलेली इंद्रिये, मन, बुद्धि ही सर्व उण्याअधिक प्रमाणांत सत्त्वरजतमांनीं व्यापलेली राहतात, म्हणून दूषित असतात. ती सत्याचे यथार्थज्ञान करून देऊं शकत नाहींत. खरें हित कशात, खरें सुख कशात, तें कळत नाहीं, आणि मग स्वाभाविकपणेंच नानाप्रकारचीं दु:खे भोगावी लागतात.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित