वीतराग म्हणजे आसक्तीच्या पार गेलेला. निरहंकारी मनुष्य स्वभावतःच अनासक्त असतो. ज्याचें ‘मी’ सुटले त्याच्याजवळ ‘माझें’ म्हणून कांहीं उरतच नाहीं. त्याला विषयोपभोगांची अभिलाषाच नसते. खाणे, पिणे, लेणे, राहणे यासाठीं अमुकच पाहिजे, इतकेंच पाहिजे, असा त्याचा आग्रह नसतो. ऐश्वर्याची, वैभवाची, संपत्तीची कामना तो करीत नाहीं.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित