वीतराग म्हणजे आसक्तीच्या पार गेलेला. निरहंकारी मनुष्य स्वभावतःच अनासक्त असतो. ज्याचें ‘मी’ सुटले त्याच्याजवळ ‘माझें’ म्हणून कांहीं उरतच नाहीं. त्याला विषयोपभोगांची अभिलाषाच नसते. खाणे, पिणे, लेणे, राहणे यासाठीं अमुकच पाहिजे, इतकेंच पाहिजे, असा त्याचा आग्रह नसतो. ऐश्वर्याची, वैभवाची, संपत्तीची कामना तो करीत नाहीं.