मानवाचे अंतःकरण यमनियमांनीं समतल होतें आणि ध्यानपूजनादि साधनानी स्वच्छ होतें. मग “अहं ब्रह्मास्मि”चा साक्षात्कार होतो आणि “सर्वं खल्विदं ब्रह्म” अनुभवास येते. ध्यानादि साधनेने मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाला कीं मग भोवती दिसणारे, भासणारे जगत् हि ब्रह्मावांचून वेगळे नाहीं, तें सर्व जसेच्या तसे ब्रह्मरूपच आहे, ब्रह्मच आहे, असे प्रत्ययास येतें.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित