संतांनी देहबुद्धि ही चांगली नाहीं तिचा निरास केला पाहिजे, ती टाकली पाहिजे, तीच मनुष्याच्या सन्मार्गसाधनेतील मोठा अडथळा आहे, तिच्यामुळेंच अनेक प्रकारच्या आपत्ती माणसाला भोगाव्या लागतात, असें अनेक प्रकारांनी वारंवार सांगितलें आहे. देहाला सर्वस्व मानण्याच्या वृतीवर परिणाम व्हावा व माणसाने विवेक करावा, हाच हेतु या पुन्हा पुन्हा सांगण्याच्या मागे आहे.