श्रद्धेला, भावनेला, विश्वासाला, बुद्धी इतकेच, तर्का इतकेच, किंबहुना थोडे अधिक मूल्य आहे. बुद्धि त्याज्य नाहीं पण भावना अधिक उपयुक्त आहे. आरंभापासून शेवटपर्यंत साथ देणारी आहे. बुद्धीने भावनेचा तोल राखावा. श्रद्धेचा रस्ता स्वच्छ करावा. भावनेची सेविका व्हावे, सखी व्हावे. स्वामिनी होण्याची अपेक्षा धरू नये.