रसायन आणि पदार्थविज्ञान शास्त्रांपेक्षां मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र वेगळेपणानें स्वीकारावे लागतें की नाहीं? जीवशास्त्राचे नियम केवळ रसायनशास्त्राच्या आणि पदार्थविज्ञानाच्या चौकटीत बसवता येतील काय? यातले जर काहीच होत नसेल आणि तरी पदार्थविज्ञानशास्त्र किंवा त्याहिपेक्षा सूक्ष्म असे परमाणूविज्ञानशास्त्र जर मूलभूत सत्य असेल तर ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ या वेदान्तावर आक्षेप घेता येणार नाहीत.