ब्रह्माशी तदाकारता यावयाची, ब्रह्मरूप व्हावयाचे, म्हणजे माझें आणि मी हे दोन्ही भाव सुटावे लागतात. “मी” मुळे “माझें” वाढत जाते आणि “माझे” मुळें “मी” पुष्ट होत जातो. यामुळे साधनक्रमांत ‘माझें’ कमी व्हावें या उद्देशाने अस्तेय, अपरिग्रह, संयम, वैराग्य या गुणांचा स्वीकार करावयास सांगितला आहे. हे गुण चांगले जोपासले, इंद्रिय-मन-बुद्धीच्या पातळीवरहि ते चांगले बाणले म्हणजे ‘मी’ सुटणे सोपे जातें, शक्य होतें. हा साधनाक्रम व्यक्तिपरत्वे नेमकेपणानें सांगण्यासाठी अनुभवी मार्गदर्शक लागतो. संत तसा असतो. तो मिळाला कीं अनंताचा शोध घेणे सुकर होते.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

