जो जो माणसाचे अधिकारपद उंच आणि कार्यक्षेत्र व्यापक, तो तो त्यानें सावध राहण्याची दक्षता अधिकाधिक घेतली पाहिजे. विचार करतांना साधकबाधक विचार करावयाचे असल्यानें अगदीं टोकावर जाऊन विचार केले तरी एकवेळ चालतात, पण वागतांना मात्र असे टोक गाठून चालत नाहीं. तेथे नेहमी मध्यमक्रमच अवलंबिला पाहिजे.