भूमितींतल्या बिंदुला लांबी, रुंदी, जाडी कांहीं नाही तरी तो जागा व्यापतो; आणि आपण कितीही सूक्ष्मपणे काढलेला कोणताहि बिंदू लांबी, रुंदी, जाडीच्या, विरहित नसतो. मूळांतील व्याख्येचें आतां काय करावयाचें? विज्ञाननिष्ठ म्हणविणाऱ्या आपल्या नित्याच्या व्यवहारात अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्या खपवून घेणाऱ्यानें परमार्थातील साधकोपयोगी व्यवहारावर आक्षेप घेणे अडाणीपणाचें आहे.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित