मूल घटक विद्युत्कण असूनहि त्यांच्या उण्याअधिक प्रमाणांनीं अत्यंत विभिन्न गुणधर्मांचे पदार्थ निर्माण होतात. त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया अगदीं वेगवेगळ्या असतात. मानवी शरीरहि अंती त्याच मूल घटकांचे असते. तरी त्याच मूल घटकांच्या विविध वस्तू शरीरावरील परिणामाच्या दृष्टीनें अन्न, औषध आणि विष अशा भिन्न भिन्न गटांत समाविष्ट होतात. मूलभूत एकता आणि एकरूपता, अंतिम सत्य असतांनाहि, त्याची यथार्थता अबाधित असतांनाहि, शरीराच्या पातळीवर अन्न आणि विष हे कधीं सारखेंच मानतां येईल काय?
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित