केवळ आधुनिक म्हणून जशी एखादी गोष्ट वाईट नसते, त्याप्रमाणेंच केवळ, परंपरेनें स्वीकारलेली म्हणूनहि एखादी गोष्ट असत्य नसते, त्याज्यहि नसते. पण हा विचार विद्वान लिहितां-बोलतांना करीत नाहींत. परंपरागत धारणांवर आघात करतांना त्यांना विलक्षण स्फुरण येतें, आणि त्या अभिनिवेशांत मग दुष्ट तर्काचा आणि असत्याचाहि पुरस्कार केला जातो. यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले अस्वास्थ्य तेवढे वाढते. वातावरण संतप्त राहून स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी तेंच कोणाला इष्ट वाटत असेल तर वेगळे. मात्र शांतता, स्वास्थ्य हवें असेल तर असें बोलतां कामा नये.