जेव्हां केव्हां बोलावयाचें, लिहावयाचे तेव्हां तें नीटपणे सर्व प्रकारचा साधक बाधक विचार करून, तज्ञांची मते चांगली पारखून, शास्त्रवचनें चांगली शोधून, थोरांच्या वाक्यांचा आधार घेऊन, मगच लिहावे वा बोलावे. लिहिण्यापेक्षां बोलणें कमी गंभीरपणाचें आहे, तेव्हां बोलतांना विशेष काळजी घेतली नाहीं तरी चालेल, असें समजूं नये. लिहिण्याइतकेंच बोलणेंहि महत्त्वाचे आहे, असेंच समजून वागले पाहिजे. खरें म्हणजे बोलणें हेंच महत्वाचे आहे. लिहिणें हा त्याचा आनुषंगिक पर्याय आहे.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित